Friday, 30 December 2011

new year च planning करा "झकास"

new year च  planning करा झकास!!
या शुक्रवारी म्हणजे  (३० डिसेंबर २०११ ) प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा झकास म्हणजे विनोदी मेजवानी आहे .
अंकुश चौधरीचा स्वतंत्र दिग्दर्शनाचा प्रयत्न अप्रतिम असाच म्हणावा लागेल,मराठी चित्रपटात असणाऱ्याcomedy of errors या सर्वाप्रचालीत आणि घासून  गुळगुळीत झालेल्या   प्रकाराला अंकुशनी एक  नवीन  धार  देण्याचा  केलेला  प्रयत्नही  लाजवाब !! अपेक्षे  प्रमाणेच  संजय  जाधव  ची  नयनरम्य  cinematography .सुंदर size zero नायिका आणि तितकाच चं अभिनय सुंदर मुली अभिनय हि चांगला करू शकतात हे फक्त मराठीतच घडू शकता बहुतेक .मध्यंतर पर्यंत चित्रपट आपला पुरेपूर ताबा घेतो मात्र मध्यंतर नंतरची काही मिनिटे थोडासा भरकटल्या सारखा वाटतो पण लगेचच सावरतो सर्वच अभिनेते अप्रतिम,सुरुवात चुकवू नका आणि शेवट सांगू नका !!! जा आणि झकास मजा करा 
 its a must watch in the new year !!http://www.mazzacinema.com/

Sunday, 11 December 2011


प्रतिबिंब 

'स्मित मूव्ही' या banner अंतर्गत प्रशांत हिरे निर्मित  'प्रतिबिंब' हा चित्रपट या ९ तारखेला प्रदर्शित झाला.मानवी नातेसंबंधांची गूढता, त्याचा शोध घेताना वाढणारी गुंतागुंत आणि व्यक्तिरेखांचा एकमेकांशी भावबंध म्हणजेच 'प्रतिबिंब'.

गिरीश मोहिते यांच दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटातून संपदा हिरे हिने पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. कथा संवाद अनिरुद्ध पोतदार आणि अभय दाखने याचं असून संगीत अवधूत गुप्तेच आहे. चित्रपटांच छायाचित्रीकरण संतोष शिंदे यांचं आहे. 

ही कथा नव विवाहित दाम्पत्य जयसिंगराजे आणि गौरी यांची आहे. जयच्या घरात प्रवेशताच ती तिच्यासारख्याच दिसणाऱ्या बाईचा फोटो पाहून चकित होते. तिला कळतं की तो जयच्या मृत पहिल्या बायकोचा, वासुमातीचा फोटो आहे. गौरीला वासुमातीचे प्रतिबिंब म्हणून जगण्याचा त्रास होऊ लागतो. आणि वसुमती गौरीच्या रुपात त्याच्या आयुष्यात परतली आहे हा जयचा विश्वास. नवऱ्याच प्रेम आणि घरच्यांचा आधार असतांना गौरीच्या आयुष्यात अचानक चमत्कारी आणि भयावः घटना घडू लागतात. एका पाठी एक संशयास्पद घडणारे मृत्यू आणि या मगच गूढ रहस्य वाढत चालले असते. 

या   सगळ्या मागे कोण असतं हे फार मनोरंजक पद्धतीने दर्शवले आहे. अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, रवींद्र मंकणी, गणेश यादव आणि बाकी सगळ्याच कलाकारांनी आपापली भूमिका चोख निभावली. असं रहस्यमय आणि कधी कधी भ्यायला लावणारा चित्रपट बनवण्याचा हा एक चांगला प्रयत्न होता.

Saturday, 3 December 2011

सात बारा कसा बदलला..

जमिनीवर मालकीसाठी भावंडांमध्ये भांडणं होतात आणि मग आयुष्यभर एकामेकांच  तोंड देखील ते पाहत नाहीत, अश्या आणि या सारख्याच खूप गोष्टी तुम्ही इकल्या असाल, खर्या आयुष्यात अनुभवल्या असाल. त्याच line वरचा अजून एक चित्रपट.

रावसाहेब इनामदार हे एक जमीनदार असतात रांजणगाव या गावामध्ये. त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. पंचक्रोशीत त्यांना देव माणूस म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या इच्च्ये प्रमाणे त्यांचा धाकटा मुलगा बापू शेती हाचं मुख्य व्यवसायाचा वारसा पुढे न्यायचा ठरवतो. पण मोठा मुलगा, अण्णा, गावचा सरपंच याला मात्र शेती नं करतं ऐशोआरामाची जिंदगी जगायची होती. तो आपल्या जमिनीतली ५० एकर जमीन गावात सुरु होणाऱ्या दारूच्या factory ला द्यायचा हट्ट करतो ज्याला त्याचा भाऊ आणि वडील दोघाही पाठींबा देत नाहीत. मग त्याच्या वडलांचा मृत्यू होतो, काही काळाने त्याच्या धाकट्या भावाच्या परिवाराचा अपघातात मृत्यू होतो आणि जमीन त्याच्या नावावर होते.

काही वर्षानंतर आदित्य नावाचा इंजिनिअर काही कामासाठी टि जमीन विकत घेण्यासाठी येतो आणि त्याला सातबारा मध्ये झालेलं घोटाळा लक्ष्यात येऊन तो अण्णा वर गुन्हा दाखल करतो. हा आदित्य कोण असतो? तो ही केस दाखल का करतो? तो ही केस जिंकतो का? रावसाहेबांचा आणि बापू व त्याच्या कुटुंबाचा आंत कसा होतो? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर उलगडत जातात.

लोकेश गुप्ते, स्वप्नील राजशेखर, प्रदीप पटवर्धन, डॉ. संजीव पाटील, तन्वी काळे, पूजा वेलिंग, नवोदित कलाकार प्रसाद ठाणगे इत्यादी कलाकारांनी काम केलेलं आहे. या चित्रपटाचा निर्माता प्रसाद ठाणगे आहेत आणि दिग्दर्शन दीपक कदम यांचं आहे. 

पाऊलवाट..

'पाऊलवाट' हा चित्रपट जरी कादंबरी वर आधारित असला तरी य सिनेमाला स्वतःची अशी एक कथा आहे, बाज आहे. Technically  तितकी उठावदार नसली तरीही कथा खूप प्रामाणिक पणे मांडली गेली आहे. 

सिनेमा चालू होतो, एक मध्यमवावर्गीय मुलापासून, की जो आपली स्थिर, गलेलठ्ठ पगाराची नौकरी सोडून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतो. का तर त्याची स्वप्ने त्याला खुणावत असतात. मग खरी कथा चालू टी त्याच्या strugle ची. त्याची धडपड, जिद्द, आकांक्षा आणि त्याचं स्वप्नं पूर्ण करण्याचं धैर्यं. हे सगळा कामाव्तांना त्याने बनवलेली नाती आणि मुंबई शहराशी जुळत चाललेलं बंधन, या भवतीच कथा फिरत राहते.

फिल्मचं संगीत pleasant आहे पण memorable नाही. या चित्रपटाच्या संगीताचं मुख्य आकर्षण म्हणजे आशा बाईंनी गायलेलं play back . या सिनेमाच ८०% शूट मुंबईत झालेलं आहे. 

At the end, पाऊलवाट movie is like an ordinary cup of coffee. हा सिनेमा entertain तर करतो पण satisfy नाही करू शकत प्रेक्षकांना. But then its a 1 time watch movie.   

by Nivedita Ware

Adgul Madgul



प्रत्येक वेळेला रंगांचे सन्दर्भ बदलत असतात. जसे विषय बदलतील तसे.  काळ्या रंगाच  पण तसेच आहे..लोकांना डोक्यावरचे केस पांढरे झाले तर ते चालत नाहीत, त्याला रंगवून काळे  केले जातात, पण तेच जर स्किन कलर विषयी असेल तर आपली दृष्टी बदलते... अडगुल  मडगुल हा चित्रपट हाच विषय खुप उत्तम सादरीकरणातून  आपल्यासमोर मांडतो..

परांजपे आणी पेंडसे एकमेकांचे व्याही..सगळेच  गोरे या सदरात मोडणारे , रीती प्रमाणे  प्रेमात पडून अनु आणी शांतनु चे लग्न होते....
 अनु ला दिवस जातात त्यावेळी तिचं खुप कोड कौतुक होत....खुपच आनंदाचं वातावरण !!!!  पण, तीला मुलगा होतो आणी सगळं चित्रच पालटून जात..कारण  तो असतो संपूर्ण पणे  काळा  कुट्ट.. मग सुरु होते विश्वासाची परीक्षा..
 जे संदर्भ लग्नाआधी खुप सहज आलेले असतात, त्यातच शांतनु काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत राहतो...अनुची घुसमट  होत रहते..घरात कुणीच मुलाला अपलेसे करत नाहीत..एका काळ्या  रंगामुले खुप गोष्टी घडत राहतात..

गोष्ट छोटी डोंगरा एवढी,गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा सारखे अत्यंत contemopary विषय लीलया हाताळल्या नंतर नागेश भोसले अरविंद जगताप या लेखक दिग्दर्शक द्वयीने एक  गंभीर असु शकणारा विषय    अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने मंडला आहे..चित्रपटाचा दूसरा भाग लक्षवेधी झाला आहे..प्रेक्षकाला विचारही करायला लावेल आणि  विचार बदलायलाही लावेल असा या चित्रपटाचा विषय आहे..मांडणी उत्तम जमली आहे..

सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिका चोख केल्या आहेत..विशेष उल्लेख करावा तो स्मिता तळवळकर यांचा, ती भूमिका त्यानीच करावी अशी त्यानी वठाली आहे. लेखक म्हणून यश मिळवल्या नंतर अरविंद जगताप यांचा अभिनेता म्हणून पडद्या वरचा वावर त्यांच्या लेखन इतकाच रेफ्रेशिंग आहे ..अधून मधून प्रयोग म्हणून त्यानी अभिनय  करायला  हरकत नाही...सुबोध भावे ला बालगंधर्वांची  ची प्रतिमा पुसायला यानिमित्ताने चांगलीच मदतच झाली आहे..गिरिजा, अनीता, नागेश भोसले सगळ्यांचं कामही छानच आहे..

एकदा जाउन  अवश्य पहावा असाच हा नवीन विषयाचा वेध घेणारा चित्रपट आहे...

Dubhang

मराठी चित्रपट सृष्टीत २५ वर्षांहून जास्त काम केलेले यशस्वी दिग्दर्शक महेश कोठारे यांचं नवा चित्रपट, नवा धमाका. त्यांच्या प्रत्येक सिनेमात काहीतरी नाविन्य असतंच. या चित्रपटाचं आकर्षण म्हणजे त्यांच्या मुलाला, आदिनाथला त्यांनी केलेले launch , उर्मिला आणि आदिनाथची chemistry आणि exciting story line. 

वेगळी theme असलेला हा चित्रपट जरी असला तरी दोन वेगवेगळ्या गोष्टींची सांगड मात्र या चित्रपट सुंदर घातली गेली आहे. love story आणि रोहन (आदिनाथ कोठारे) ची ध्येयवेडी आशा Olympics जिंकण्याची आणि या दोन्हीमध्ये त्याची होणारी तारांबळ. त्यातच एका भाउक क्षणी त्याची आणि  industrialist सचित (अजिंक्य देव) ची भेट होते आणि ते एक deal ठरवतात. या deal वरून पुढे होणारे problems रोहन कसा हाताळतो हे पाहण्यासारखा आहे. 

आदिनाथनी उर्मिलाच्या तोडीस तोड acting करून महेश कोठारेंना खुश केला आहे. अजिंक्य देव यांनी देखील उत्कृष्ट काम केले आहे. या सिनेमात सोनाली कुलकर्णी, सीमा देव, सुनील तावडे,विजय चावण, निलेश साबळे, गणेश यादव, आरती सोलंकी या कलाकारंनी देखील काम केला आहे. cinematography आणि editing दोन्ही चं आहे. शंकर मिटकरी (साई शंकर फिल्म्स) यांनी Produce केलेला आणि अभिराम भादाम्कर यांनी लिहिला असून शेखर ढवळीकर यांचं sceenplay आहे.

एकदा पहावाच असा हा चित्रपट असला तरी action plus family हे combination मस्त आहे. Lets see , या नव्या सिनेमाला आणि नव्या जोडप्याला प्रेक्षक कसे स्वीकारतात.

Swarajya

Producer - Raees Lashkariya
Director - Vishal - Vihar
Music - Nitin Hivarkar 
Cast - Rajesh Shrungarpure, Arun Nalavde, Anshuman Vichare, Illa Bhate, Rajan Bane, Jayant Patekar, Namrata Gaikwad, Sushrut Mankani, VArsha Dandale, Kiran Mane, Bala Javkar, Nirmal Kotnis, Ramesh Wani, Jaywant Bhalekar, Ashok Kulkarni, Arun Mohare, Chaitanya Chandretre, Darshan Jariwala, Shahbaaj Khaan.

 The burning isue of 'Marathi Manus' have exploited by two rival political parties in Maharashtra. But, the marathi films also have been doing their bit to raise these issues through better scripts. In the recent past, we saw movies like "Me Shivaji Raje..." followed by "Arjun" encouraging the 'Marathi Manus' in Maharashtra to raise against injustice.

Now, director duo Vishal - Vihar have carried forward this success formula through their suitably titled film 'Swarajya' with a tag line 'Marathi Paul padti Pudhe'. Though the theme of the film is the same as previous two films.

Swarajya goes furher to encharage the educated youth to move with unity as strength. The film does have a melodrama to expose SRA related manipulations, corruption by political leaders through hard hitting dialogues which is USP of this film.

All this was possible only because of a good star cast led by the angry young man Rajesh Shrungarpure, who with his graceful personality and rich voice, almost rocks in this film. supported by well presented screenplay. The film is for sure to inspire otherwise tolerate people from Maharashtra.

by Nivedita Ware. 
   

Deool

खरं सांगायचं झालं तर आगदी योग्य म्हंटल जातं, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या मध्ये खूप कमी अंतर आहे. श्रद्धेने प्रोत्साहन मिळतं पण अंधश्रद्धा मुळे मात्र नुकसानच होण्याची शक्यता जास्त असते. आजच्या so called modern जगात, कुठे तरी जगाच्या कोपर्यात, जिथे शिक्षणाची पोच नाही तिथे आजही हे आसे हृदय हेलावून टाकणारेप्रकार घडतात, फरक इतकाच की आपण त्या साऱ्या पासून खूप दूर आहोत. 

आसाच खूप हलवा आणि भावनिक विषय "देउळ" हा चित्रपट मांडतो. एका भोळ्या भाबड्या माणसाला कसे दत्तं भगवान दिसतात आणि त्या गोष्टीचा कसा बोभाटा होऊन राजकारणी लोक कसे याचा फायदा घेतात ह्याची मांडणी खूपच उत्कृष्टपणे केली आहे. Technically perfect. Cinematography , editing . dialogues , characterization excellent. 

प्रत्येक कलाकाराने अप्रतिम काम केले आहे. गिरीश कुलकर्णीन बद्दल तर काही बोलायलाच नोको. जीव ओतून काम करणं काय असतं हे लगेच कळतं. नाना पाटेकर यांना ताकदीची टक्कर दिली ते दिलीप प्रभावळकरांनी. नानांचे exprations क्या बात हैं!! प्रभावळकरांनी केलेली जवाबदारीची भूमिका तर एक नंबर. आणि प्रेक्षकांचे डोळे दिपले ते नसरुद्दिन शाह यांना पाहून. 

एकंदरीत अप्रतिम कलाकृती आणि मराठी माणसाने एकदा तरी पाहावा असा हा सिनेमा.